विदर्भातील शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळाली नसतांना गारपिटीने रब्बीच्या पिकांसोबतच संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपचे आमदार गेल्या आठवड्याभरापासून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनावर बसले आहे. पण आमदारांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपाच्या मागे दिलीप लोहे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
